भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानी भडकले, पाकिस्तानी नेत्यांवर जोरदार टीका

उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानचे राजकारण चांगलंच ढवळून निघालंय.

Updated: Sep 30, 2016, 11:40 AM IST
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानी भडकले, पाकिस्तानी नेत्यांवर जोरदार टीका title=

इस्लामाबाद : उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानचे राजकारण चांगलंच ढवळून निघालंय.

भारतीय सैन्याने आपली ताकद दाखवलीये तर दुसरीकडे सोशल मीडियावर पाकिस्तानी यूजर्स आपल्याच नेत्यांना शिव्या देतायत. पाकिस्तानी यूजर्स भारताच्या या कारवाईसाठी नवाझ शरीफ यांच्यापासून इमरान खान यांच्यावर टीका करतायत.

एका यूजर्सने तर भारत बॉर्डरवर प्रेशर वाढवतोय तर दुसरीकडे इमरान खानला पंतप्रधान न बनल्याचे दु:ख सतावतेय. तर एका युजर्सने म्हटलेय की, एलओसी आणि सीमेवर तणावर वाढतोय तर पंतप्रधान नवाझ लंडनमध्ये हॉलिडे आणि शॉपिंगची मजा लुटतायत. 

भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानात ट्विटरवर #kaptantayyarsherbemar ट्रेंड करतोय.