जिनके घर शीशे के होते हैं...सुषमा स्वराजांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांमध्ये खडसावलं आहे.

Updated: Sep 26, 2016, 07:49 PM IST
जिनके घर शीशे के होते हैं...सुषमा स्वराजांचा पाकिस्तानवर हल्लाबोल  title=

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांमध्ये खडसावलं आहे. दहशतवादाचा मुद्दा तसंच काश्मीर प्रश्नावरून सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला लक्ष्य केलं.

सुषमा स्वराज भाषणात काय म्हणाल्या? 

- दहशतवाद पोसणं काहींचा छंद

- दहशतवाद पोसणाऱ्यांना वाळीत टाका

- काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये

- काश्मीर भारताचा भाग आहे आणि राहणार, स्वप्न बघणं सोडा

- बलुचिस्तानमधल्या जनतेवर सरकारकडून अत्याचार

- मैत्रीसाठी आम्ही हात पुढे केला, पण आम्हाला उरी आणि पठाणकोट मिळालं

- दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ कोण देतं?