अखेर सलमान सोबत काम करण्याबाबत ऐश्वर्यानं सोडलं मौन!

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं सलमान सोबत काम करण्याबाबत मौन सोडलंय. ऐश्वर्या म्हणाली, संजय लीली भंसालींचा चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मध्ये काम करण्याचं तिला जराही खंत नाहीय. पहिले या चित्रपटात ऐश्वर्या काम करणार होती. हा चित्रपट भंसालींचा सर्वात खास चित्रपट असल्याचं बोललं जातंय.

Updated: Oct 8, 2015, 09:53 AM IST
अखेर सलमान सोबत काम करण्याबाबत ऐश्वर्यानं सोडलं मौन! title=

मुंबई: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं सलमान सोबत काम करण्याबाबत मौन सोडलंय. ऐश्वर्या म्हणाली, संजय लीली भंसालींचा चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मध्ये काम करण्याचं तिला जराही खंत नाहीय. पहिले या चित्रपटात ऐश्वर्या काम करणार होती. हा चित्रपट भंसालींचा सर्वात खास चित्रपट असल्याचं बोललं जातंय.

भंसाली १९९९मध्ये आलेला चित्रपट 'हम दिल दे चुके सनम'च्या यशानंतर 'बाजीराव-मस्तानी'मध्ये सलमान आणि ऐश्वर्याला मुख्य भूमिकेसाठी घ्यायचं होतं. 

आणखी वाचा - तरुणींनी सलमानचं हृदय नाही... तर पाकिट आणि वस्तू लुटल्या!

चित्रपटात आता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण आहेत. याबाबत ऐश्वर्याला विचारलं असता ती म्हणाली, 'चित्रपटात सुरूवातीपासून त्यांना खास कलाकारांना घ्यायचं होतं.  तसं झालं असतं तर मी मस्तानीच्या रुपात असती. पण असं तेव्हाच झालं असतं जेव्हा त्यांनी विचार केलेला अभिनेता (सलमान खान) बाजीराव असता.'

ऐश्वर्या म्हणाली, 'मात्र असं झालं नाही, याबाबत आम्ही चर्चा केली. ही बाब अशी नाहीय की, याबद्दल विचार केला जाईल, काळजी केली जाईल. प्रत्येक चित्रपटाचं भविष्य ठरलं असतं, तो तिथेच पोहोचतो जिथं त्याला जायचं असतं.' ऐश्वर्या पाच वर्षानंतर संजय गुप्ता यांच्या 'जज्बा'मध्ये दिसणार आहे.

आणखी वाचा - सलमान-आमीरच्या मैत्रीत फूट?

ऐश्वर्या म्हणाली, मी भंसालींना 'बाजीराव-मस्तानी'बाबत चिडवलं सुद्धा... ऐश्वर्यानं भंसालींच्या दोन हिट चित्रपटात काम केलंय, 'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास'मध्ये होती.  भंसालींसोबत माझं जवळचं नातं आहे, असंही ऐश्वर्या म्हणाली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.