अनुष्का - विराटमध्ये पुन्हा बिनसलं...?

सगळ्याच यंग कपलच्या नात्यांमध्ये चढ-उतार येत असतात. पण जर सेलिब्रिटी कपलची गोष्ट असेल तर नक्कीच गॉसिप बनतं. आणि हेच विराट आणि अनुष्का बरोबर होतंय.

Updated: Oct 7, 2016, 08:59 PM IST
अनुष्का - विराटमध्ये पुन्हा बिनसलं...? title=

मुंबई : सगळ्याच यंग कपलच्या नात्यांमध्ये चढ-उतार येत असतात. पण जर सेलिब्रिटी कपलची गोष्ट असेल तर नक्कीच गॉसिप बनतं. आणि हेच विराट आणि अनुष्का बरोबर होतंय.

अनुष्का विराट पुन्हा झाले वेगळे

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ब्रेकअपनंतर अनुष्का आणि विराटने आपल्या नात्याला पुन्हा एक चान्स देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांचे फॅन्सपण या लव्हस्टोरीच्या पार्ट टू साठी एक्साईट झाले होते. अनुष्का आणि विराट सातत्याने भेटत होते. एव्हढचं नाही तर सिनेमाच्या सेटवर पण दोघांच्या भेटी गाठी होत होत्या. अनुष्काच्या मागे मागे विराट लिजबनमध्ये पोहोचला होता. मात्र, आता ही लव्हस्टोरी फार काळ टीकणार नाही अशी चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतेय. 

यावेळी, या दोघांमधील वाढत्या दुराव्याचं कारणही तसंच आहे. विराटच्या वाढत्या पझेसिव्हनेसला अनुष्का जाम वैतागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विराटने पुन्हा एकदा अनुष्काला लग्नासाठी प्रपोझ केला होता मात्र अनुष्काने पुन्हा विराटला लग्नासाठी नकार दिल्याची चर्चा सध्या बीटाऊनमध्ये रंगते आहे.

पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफचा घोळ...

अनुष्काला सध्या आपल्या करियरवर फोकस करायचाय. मोठ्या बॅनरच्या सिनेमांव्यतिरीक्त अनुष्का सध्या तिच्या स्वत:च्या प्रॉडक्शनमध्येही बिझी आहे. त्यामुळेच आपलं बिझी शेड्युल बघता अनुष्काने एवढ्यात लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुष्काने एका कार्यक्रमादरम्यानही यापुढे कुठलीचं पर्सनल गोष्ट पब्लिकली शेअर करणार नसल्याचं म्हटलं आहे.

'मी माझं नातं कधीच बंद दरवाज्याआड लपवून ठेवलं नाही. पण आता मी याबद्दल काहीच बोलणार नाही. कारण या गोष्टींची चर्चा माझ्या कामापेक्षा जास्त होते' असं अनुष्काने स्पष्टपणे सांगून टाकलंय.  

अनुष्का-विराटमध्ये झालेल्या ब्रेकअफच्या चर्चेने त्यांचे फॅन्स मात्र दुखी झाले आहेत..अनुष्कानेही या चर्चेवर काही प्रतिक्रिया न देता शांत राहणंचं पसंत केलं आहे..त्यामुळे या लव्हबर्ड्समध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.