शाहरुखची मैत्री गमावण्याची किंमत फराहला समजली...

शाहरुख खानसोबत आपला तिसरा सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ घेऊन दिग्दर्शिका फराह खान लवकरच प्रेक्षकांसमोर येतेय. अशावेळी, हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आपांपातील मैत्रीला जास्तीत जास्त महत्त्व देताना दिसतायत.

Updated: Sep 25, 2014, 03:09 PM IST
शाहरुखची मैत्री गमावण्याची किंमत फराहला समजली... title=

नवी दिल्ली : शाहरुख खानसोबत आपला तिसरा सिनेमा ‘हॅपी न्यू इअर’ घेऊन दिग्दर्शिका फराह खान लवकरच प्रेक्षकांसमोर येतेय. अशावेळी, हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आपांपातील मैत्रीला जास्तीत जास्त महत्त्व देताना दिसतायत.

फराह खान (49) हिनं शाहरुखसोबत ‘मैं हूँ ना’ आणि ‘ओम शांति ओम’सारख्या हीट सिनेमांमध्ये दिग्दर्शक म्हणून काम केलंय. पण, 2012 मध्ये संजय दत्तनं आयोजित केलेल्या एका पार्टीत शाहरुख आणि फराहचा पती शिरीष कुंदर यांच्यामध्ये भांडण झालं... आणि त्यांच्या मैत्रिमध्ये मिठाची गुळणी पडली... फराहनं साहजिकच आपल्या पतीची बाजू घेऊन शाहरुखशी काही काळ संबंध टाळले.
 
पण, त्यांच्यातील हा नाराजीपणा फार काळ टिकून राहिला नाही आणि फराहनं शाहरुखसोबत आपला बहुप्रतिक्षित ‘हॅपी न्यू ईअर’ हा सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला... आता हा सिनेमा शेवटच्या टप्प्यात आहे. 

या सिनेमात दीपिका पादूकोण, अभिषेक बच्चन, बोमन ईरानी, सोनू सूद आणि विवान शाह दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या 24 ऑक्टोबर रोजी सिनेगृहांत झळकणार आहे. 
फराहला विश्वास आहे की हा तिचा आत्तापर्यंतचा सर्वात चांगला सिनेमा ठरेल. शाहरुख आणि माझ्यासाठी एक अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून हा एक खूप चांगली वेळ आहे, असं एका मुलाखतीत नुकतंच फराहनं म्हटलंय. 

‘मला वाटतं की आम्ही एकमेकांना खूप सहजतेनं घ्यायला हवं... जेव्हा तुम्ही अशी एखादी मैत्री गमावता तेव्हाच तुम्हाला याची किंमत माहीत पडते’ असंही यावेळी फराहनं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.