काजोलने लग्नाचा निर्णय का घेतला?

बॉलिवूडची  अभिनेत्री काजोलने अजय देवगणशी लग्न करण्याचे कारण एका  मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

Updated: Sep 3, 2016, 10:49 AM IST
काजोलने लग्नाचा निर्णय का घेतला?      title=

मुंबई : बॉलिवूडची  अभिनेत्री काजोलने अजय देवगणशी लग्न करण्याचे कारण एका  मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

'मला जीवनात आणि माझ्या करिअरमध्ये विश्रांतीची गरज होती. माझ्याकडे पैसा श्रीमंती आणि चित्रपट खूप होतं पण मला आराम नव्हता. शांततेत मला जीवन जगायचय होतं' अस  मुलाखती दरम्यान काजोलने म्हटलं आहे.

मी 9 वर्षांपासून चित्रपटात काम करत होते  प्रत्येक वर्षात माझे 3-4 चित्रपट यायचे. पण मला कुठेच विश्रांती नसल्यामुळे मी लग्नाचा निर्णय घेतल्याचं काजोलने सांगितले आहे.

लग्नानंतर मी वर्षातून जास्तीत जास्त एकचं सिनेमा करीन असं तिने ठरवलं असल्याचे सांगितले.

काजोलने बॉलिवूडला अनेक हिट सुपरहिट चित्रपट दिले, पण जीवनातले तिने घेतलेले महत्त्वाचे निर्णय सांगताना काजोल भावूक झाली होती.