प्रत्युष्याच्या आईचं फडणवीसांना पत्र

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आईनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. 

Updated: Apr 15, 2016, 05:24 PM IST
प्रत्युष्याच्या आईचं फडणवीसांना पत्र title=

मुंबई: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आईनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. प्रत्युषाच्या मृत्यूची क्राईम ब्रांचकडून चौकशी करा अशी मागणी या पत्रामध्ये प्रत्युषाच्या आईनं केली आहे. 

'मृत्यूला राहुल जबाबदार'

प्रत्युषाच्या मृत्यूसाठी तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग जबाबदार असल्याचा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे. राहुलनं फक्त प्रत्युषाच नाही तर इतर मुलींनाही धोका दिला आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचं या पत्रात म्हंटलं आहे. 

पत्रात मुंबई पोलिसांवरही आरोप

प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जीनं या पत्रात गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर आणि संयुक्त पोलीस आयुक्त देवन भारतींचंही नाव घेतलं आहे. तसंच पोलीस आमची तक्रार ऐकत नसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. 

'राहुल साक्षीदारांना धमकावतोय'

या प्रकरणातल्या साक्षीदारांना राहुल धमकावत असल्याचा आरोपही प्रत्युषाच्या आईनं केला आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी क्राईम ब्रांचला ही केस द्या अशी मागणी प्रत्युषाच्या आईनं केली आहे. 

1 एप्रिलला प्रत्युषा बॅनर्जीचा मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेमध्ये सापडला होता. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.