रणबीर-कतरिनाने घेतल्या लग्नाच्या आणाभाका

सेलिब्रिटींच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा माध्यमांमध्ये नेहमीच असतात, ही चर्चा थांबवण्यासाठी यावरील उत्तर देणे टाळण्यात, सेलिब्रिटीही पटाईत असतात. मात्र रणबीर आणि कतरिना असं काहीही लपवून ठेवणाऱ्यातले दिसत नाहीत. कारण रणबीर कपूरने यावर पहिल्यांदा याबाबत कबुली दिलीय.

Updated: Feb 11, 2015, 03:42 PM IST
रणबीर-कतरिनाने घेतल्या लग्नाच्या आणाभाका title=

मुंबई : सेलिब्रिटींच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा माध्यमांमध्ये नेहमीच असतात, ही चर्चा थांबवण्यासाठी यावरील उत्तर देणे टाळण्यात, सेलिब्रिटीही पटाईत असतात. मात्र रणबीर आणि कतरिना असं काहीही लपवून ठेवणाऱ्यातले दिसत नाहीत. कारण रणबीर कपूरने यावर पहिल्यांदा याबाबत कबुली दिलीय.

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील हॉट फेवरीट जोडी अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, या जोडीचे गुफ्तगू अनेक दिवसांपासून गुलदस्त्यातच आहे. रणबीर कपूरने पहिल्यांदाच याबाबत कबुली दिलीय.

रणबीर कपूरने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, ‘एंगेजमेंट म्हणजे जगाला सांगायचं तर आम्ही दोघं लग्न करण्याशी एकमेकांशी वचनबद्ध आहोत. मात्र, आयुष्याच्या त्या टप्प्यावर मी अजून पोचलो नाही.

रणबीर आणि कपूर कुटुंबीयांबाबत मी किती काळजी वाहते, ते सांगत आपल्या प्रेमाची कतरिनानेही एका मुलाखतीत कबुली दिली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कतरिनाला सून म्हणून स्वीकारण्यास रणबीरचे आई-वडील, नीतू कपूर आणि ऋषि कपूर हे फारसे उत्सूक नव्हते अशी चर्चा होती. तसेच, रणबीरशी लग्न करू नको असा सल्ला कतरिनाला दीपिका पदुकोन हिने नकताच एका चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिला होता.

‘प्रॉमिस डे‘निमित्त आपण घेतलेल्या आणाभाकांची कबुली रणबीरनं दिलीय. त्याची अंमलबजावणी ही जोडी कधी करतेय याकडे आता त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.