औरंगाबादमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यीनीची आत्महत्या

दहावीचा पेपर देऊन आल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडलीये.

Updated: Mar 20, 2017, 11:08 PM IST
औरंगाबादमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यीनीची आत्महत्या title=

औरंगाबाद : दहावीचा पेपर देऊन आल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडलीये.

वाळुंज येथे ही घटना घडलीये. ती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होती. आज दुपारी ती विज्ञान भाग २ हा पेपर देऊन आली. 

मात्र त्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसल्याचा फायदा घेत गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, विद्यार्थिनीने ही आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.