अभिनेते सयाजी शिंदे यांनी लावलेल्या वृक्षांची रात्रीत कत्तल

अभिनेते सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पांढरवाडी इथं सहा महिन्यांपूर्वी वृक्षारोपण केलेल्या झाडांची कत्तल झाल्याचं उघड झालंय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 18, 2017, 07:12 PM IST
अभिनेते सयाजी शिंदे यांनी लावलेल्या वृक्षांची रात्रीत कत्तल title=

सातारा : अभिनेते सयाजी शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पांढरवाडी इथं सहा महिन्यांपूर्वी वृक्षारोपण केलेल्या झाडांची कत्तल झाल्याचं उघड झालंय. 

समाजकंटकांनी ही कत्तल केल्याचं बोललं जात असून ग्रामस्थांनी याचा संताप व्यक्त केलाय. 

या भागातील दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी सयाजी शिंदे यांनी पांढरवाडी गावासह इतर सहा गावांत सुमारे 25 हजार झाडं लावली होती. गेली सहा महिने गावकरी आणि ग्रामस्थांना या झाडांना टँकरने पाणीपुरवठा केला. 

मात्र रात्री अंधारात काही समाजकंटकांनी कु-हाडीने शेकडो झाडं तोडलीत. ही दृष्यं पाहून गावकरी आणि विद्यार्थी दुःखी झाले असून त्यांनी संताप व्यक्त केलाय.