मनसे पदाधिकाऱ्यांवर कल्याणमध्ये प्राणघातक हल्ला

भांडणात मध्यस्थी केल्यावरून कल्याण पश्‍चिमेतील मनसेचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला. आरोपींना २४ तासांच्या आत अटक न झाल्यास कल्याण शहर बंद करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

Updated: Nov 23, 2014, 11:54 AM IST
मनसे पदाधिकाऱ्यांवर कल्याणमध्ये प्राणघातक हल्ला  title=

कल्याण : भांडणात मध्यस्थी केल्यावरून कल्याण पश्‍चिमेतील मनसेचे शाखाध्यक्ष प्रमोद भोईर यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला. आरोपींना २४ तासांच्या आत अटक न झाल्यास कल्याण शहर बंद करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

कल्याणमध्ये मनसेच्या शाखा अध्यक्ष प्रमोद रणसुख भोईर, स्वप्नील वर्पे आणि रतन केणे या तिघांवर विजय मधुकर तेली याने आपल्या मित्रांसमवेत धारदार चाकू, दगड आणि बाटलीच्या सह्हायाने प्राणघातक हल्ला केला. तिघांवरही कल्याणच्या फोर्टीज हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 

भोईर हे चिकणघर विभागाचे शाखाध्यक्ष असून त्यांच्या कार्यालयात काम करणारा केणे आणि विजय तेली या दोघांचे शुक्रवारी रात्री ११च्या सुमारास किरकोळ भांडण झाले. याची माहिती मिळताच भोईर यांनी दोघांनाही कार्यालयात बोलवून त्यांची समजूत घातली. 

या रागातून तेलीने आपल्या साथीदारांच्या मदतीने भोईर यांच्यासह स्वप्निल वर्पे आणि रतन केणे या तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात तिघे जण गंभीर स्वरूपात जखमी झालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.