अहमदनगरमध्ये बसचा भीषण अपघात टळला

अहमदनगर जिल्ह्य़ातल्या अकोले तालुक्यातल्या बारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात होता होता टळलाय.

Updated: Jul 21, 2016, 12:45 PM IST
अहमदनगरमध्ये बसचा भीषण अपघात टळला title=

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्य़ातल्या अकोले तालुक्यातल्या बारी घाटात एसटी बसचा भीषण अपघात होता होता टळलाय.

बारी घाटावरुन जात असताना बस दरी पासून अवघ्या दहा फुटांवर बस थांबली. चालकाने वेळीत प्रसंगावधान राखत बसवत नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील तब्बल ६० जणांचे प्राण वाचले. या अपघातात 20 जण जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.