बाराखडी आली नाही म्हणून... बापानं केली मुलीची हत्या

क्रोध माणसाला कुठल्या पातळीवर नेऊ शकतो, हे दाखवून देणारी एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना औरंगाबादमध्ये घडलीय. 

Updated: Jul 12, 2016, 03:52 PM IST
बाराखडी आली नाही म्हणून... बापानं केली मुलीची हत्या title=

औरंगाबाद : क्रोध माणसाला कुठल्या पातळीवर नेऊ शकतो, हे दाखवून देणारी एक धक्कादायक आणि तितकीच क्रूर घटना औरंगाबादमध्ये घडलीय. 

औरंगाबादच्या बाळापूर भागात बापानंच आपल्या सहा वर्षांच्या मुलीचा खून केलाय. मुलीला बाराखडी येत नसल्याचा राग आल्यामुळं बापानं तिच्या तोंडात कांदा कोंबला. यामुळं मुलीचा गुदमरून मृत्यू झाला.

भारती कुटे असं या चिमुरडीचं नाव आहे. आपला गुन्हा लपवण्यासाठी भेदरलेल्या राजेश कुटेनं मुलीचा मृतदेह बाळापूर शिवारात पुरला. 

मात्र, मुलीच्या आईनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.

नराधम बाप असणाऱ्या आरोपी राजेश कुटेला पोलिसांनी अटक केलीय.