लग्न सोहळ्यात आईस्क्रीम खाण्यावरून मारहाण

बदलापूर चामटोली येथील सह्याद्री मंगल कार्यालयात रविवारी एक लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात जेवण झाल्यावर आईस्क्रीम खाण्यावरून झालेल्या भांडणात हॉटेल मालक बाळाराम जाधव यांना वरपक्षाकडील नातेवाईकाकंडून मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. 

Updated: Mar 7, 2016, 11:08 PM IST
लग्न सोहळ्यात आईस्क्रीम खाण्यावरून मारहाण title=

मुंबई : बदलापूर चामटोली येथील सह्याद्री मंगल कार्यालयात रविवारी एक लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात जेवण झाल्यावर आईस्क्रीम खाण्यावरून झालेल्या भांडणात हॉटेल मालक बाळाराम जाधव यांना वरपक्षाकडील नातेवाईकाकंडून मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय. 

आईस्क्रीम काऊंटरवर घडलेल्या गोंधळानंतर हॉटेल मालक बाळाराम जाधव यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र  जाधव  यांना मारहाण करण्यात आली आणि हा सारा प्रकार हॉलमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. 

मारहाणीत जाधव यांच्या गळ्यातील सोन्याची चैनही चोरीस गेली आहे. या प्रकरणी बाळाराम यांचा मुलगा सचिन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.