भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा

 भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा झालीय. मानवत तालुक्यातील राजुरा येथील ही घटना. 30 जणांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विषबाधा झालेल्या 30 जणांमध्ये 22 लहान मुलामुलींचा समावेश आहे. परभणीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. सप्ताहमध्ये शनिवारी सकाळी या सर्वांनी पोहे खाल्ले होते. 

Updated: Apr 23, 2017, 03:28 PM IST
भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा title=

परभणी : भागवत सप्ताहात खाल्लेल्या अन्नातून विषबाधा झालीय. मानवत तालुक्यातील राजुरा येथील ही घटना. 30 जणांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विषबाधा झालेल्या 30 जणांमध्ये 22 लहान मुलामुलींचा समावेश आहे. परभणीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलंय. सप्ताहमध्ये शनिवारी सकाळी या सर्वांनी पोहे खाल्ले होते. 

रात्री उशिरा त्रास होत असल्याने या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं आहे.