उदगीरमध्ये 20 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा

लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये 20 विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनातून विषबाधा झालीय. उदय प्राथमिक विद्यालयात हा प्रकार घडलाय. मध्यान्न भोजन योजनेनुसार जेवणात खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

Updated: Feb 3, 2016, 04:27 PM IST
उदगीरमध्ये  20 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा title=

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये 20 विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनातून विषबाधा झालीय. उदय प्राथमिक विद्यालयात हा प्रकार घडलाय. मध्यान्न भोजन योजनेनुसार जेवणात खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यामुळं या विद्यार्थ्यांना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या विद्यार्थ्यांनी प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र नेमके कशाची विषबाधा हे समजू शकले नाही. दरम्यान या प्रकरणी दोषी असणाऱ्या शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.