मराठा मोर्चाबाबत राज्य सरकारचं एक पाऊल पुढे

 मराठा मोर्चांबाबत राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. जिल्हा पातळीवर राज्य सरकार मूक मोर्चा आयोजकांशी चर्चा करणार आहे.

Updated: Sep 26, 2016, 07:05 PM IST
मराठा मोर्चाबाबत राज्य सरकारचं एक पाऊल पुढे title=

मुंबई : मराठा मोर्चांबाबत राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. जिल्हा पातळीवर राज्य सरकार मूक मोर्चा आयोजकांशी चर्चा करणार आहे. मराठा मोर्चाची कोंडी सोडवण्यासाठी मंत्रीसमूह स्थापन करण्याचा प्रस्तावही आहे.

एक मंत्री आणि दोन विरोधी पक्षनेते एकत्र येऊन हा गट तयार होणार आहे. हा गट जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन मराठा मोर्चा आयोजकांशी जाऊन चर्चा करणार आहे. याबाबत लवकरच विरोधी पक्षनेत्यांबरोबर राज्य सरकार चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.