हत्या करून पळणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू

पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या करून पळून जाणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू झाला आहे.  औरंगाबादच्या वक्रतुंड कॉम्पेलक्स ही घटना घडली. मनोज गुरूले यांने अश्विनी गुरूलेचा खून केल्यानंतर, या पतीने कारने पळ काढला.

Updated: Nov 12, 2016, 05:41 PM IST
हत्या करून पळणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू title=

औरंगाबाद : पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या करून पळून जाणाऱ्या पतीचा अपघातात मृत्यू झाला आहे.  औरंगाबादच्या वक्रतुंड कॉम्पेलक्स ही घटना घडली. मनोज गुरूले यांने अश्विनी गुरूलेचा खून केल्यानंतर, या पतीने कारने पळ काढला.

 मात्र  मनोज गुरूलेचा औरंबाद-नाशिकरोडवर त्याच्या कारला अपघात झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या दाम्पत्याला ८ वर्षाची मुलगी आहे. यापूर्वीही पोटगीसाठी मनोजने अश्विनीला धमकी दिल्याचं अश्विनच्या बहिणीने म्हटलं आहे.