तब्बल तीन दिवसांनी दिव्यात प्रकाश

शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून अंधारात असणा-या दिव्यात आज पहाटे साडे सहा वाजता अखेर दिवे लागले. गेल्या तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळं शाळा, महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 

Updated: Jul 5, 2016, 08:37 AM IST
तब्बल तीन दिवसांनी दिव्यात प्रकाश title=

ठाणे : शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून अंधारात असणा-या दिव्यात आज पहाटे साडे सहा वाजता अखेर दिवे लागले. गेल्या तीन दिवसांपासून लाईट नसल्यामुळं शाळा, महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 

रुग्ण, नागरिक, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. तीन दिवस वीज नसल्यामुळं नागरिकांमध्ये संतप्त भावना होत्या. 

शीत पेय विक्रेते आणि आईस्क्रिम विक्रेत्यांनाही याचा मोठा फटका बसला. हजारो रुपयांचं आईस्क्रीम फेकून देण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. तर खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयू बंद असल्यामुळं रुग्णांचे प्रचंड हाल झाले. 

Tags: