कोल्हापुरात नवविवाहीत दाम्पत्याचा चाकूने भोसकून खून

 शहरातील कसबा बावडा येथे नवविवाहीत दाम्पत्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दोघे अज्ञात घरात घुसले आणि त्यांनी दाम्पत्याला भोसकले.

Updated: Dec 17, 2015, 10:54 AM IST
कोल्हापुरात नवविवाहीत दाम्पत्याचा चाकूने भोसकून खून title=

कोल्हापूर : शहरातील कसबा बावडा येथे नवविवाहीत दाम्पत्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. दोघे अज्ञात घरात घुसले आणि त्यांनी दाम्पत्याला भोसकले.

इंद्रजित  कुलकर्णी आणि त्याची पत्नी मेघा यांची हत्या ऑनर किलिंगचा प्रकरण असल्याचं संशय व्यक्त होतोय. कसबा बावड्यातला सातवे गावचा इंद्रजित कुलकर्णी आणि थेरगावच्या मेघा पाटील  यांनी २४ जून २०१४ ला प्रेम विवाह केला. विवाहानंतर हे दोघेही वर्षभर बाहेर राहत होते. 

सहा महिन्यांपूर्वी ते कसबा बावड्यात परत आले. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांचा आवाज ऐकून घरमालकीण बाहेर आल्या. यावेळी अंदाजे २० ते २५ वयोगटांतील दोन तरुण जिन्यावरून खाली पळत असल्याचे त्यांना दिसले.

हल्लेखोर पाहून त्यांनी आरडाओरड सुरू करताच हल्लेखोर पसार झाले. या प्रकरनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला. असून पोलिसांनी रात्री उशिरा २ तरुणांना ताब्यात घेतले आहे.