टोल, वाळूच्या पैशाने राजकारण नासवले : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील ज्येष्ठे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. टोल, वाळूच्या पैशाने राज्यातील राजकारण नासवले, असे ते म्हणालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 22, 2017, 02:33 PM IST
टोल, वाळूच्या पैशाने राजकारण नासवले : चंद्रकांत पाटील title=

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील ज्येष्ठे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. टोल, वाळूच्या पैशाने राज्यातील राजकारण नासवले, असे ते म्हणालेत.

टोलचा पैसा आणि वाळूच्या पैशानं महाराष्ट्राचं राजकारण खऱ्या अर्थाने नासवले गेले आहे. टोल आणि वाळूच्या पैशांवर राजकारण चालते, अशी खळबळजनक कबुली, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात दिली. 

यात गावपातळीपासून शिवसेना भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते सामील असतात, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

वाळू माफियांचा बंदोबस्त करा : गुलाबराव 

शिवसेना राज्य मंत्री यांनी हाच धागा पकड, वाळू माफियांवर हल्लाबोल चढवला. यावर राज्याच्या महसूल मंत्र्यांना पाया पडून आपण विनंती करतो की, त्यांनी वाळू माफियांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.