'शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम बेगडी'

शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम हे बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. राज्यात कर्जमाफीचा विषय महत्वाचा असतांना याचे लोकसभेतील खासदार हे हवाई प्रवासावरून भांडताना दिसून आले. मात्र त्या वेळी कोणीही कर्जमाफीच्या मुद्यावर खासदार भांडले नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 11, 2017, 11:53 AM IST
'शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम बेगडी'  title=

अहमदनगर : शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम हे बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. राज्यात कर्जमाफीचा विषय महत्वाचा असतांना याचे लोकसभेतील खासदार हे हवाई प्रवासावरून भांडताना दिसून आले. मात्र त्या वेळी कोणीही कर्जमाफीच्या मुद्यावर खासदार भांडले नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली. 

लोणी येथे अहमदनगर जिल्हा परीषेदच्या नुतन पदाधिका-याच्या सत्कार सभारंभाच्या कार्यक्रमात विखेंनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यावर  पुन्हा एकदा टिकेची तोफ डागली आहे.  

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'मी मुख्यमंत्री बोलतोय असं म्हणतायेत. मात्र, त्यांनी चार ठरवलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्या ऐवजी आता जनतेत जावून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे आवाहन विखे पाटलांनी केले आहे.