ठाण्यात या भागात शनिवारी ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद

या काळात ठाणे पालिकेच्या योजनेतून टप्प्याटप्याने पाणीपुरवठा करण्यात येईल. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 16, 2017, 08:39 AM IST
ठाण्यात या भागात शनिवारी ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद title=

ठाणे : ठाणेकरांनो पुढील काही दिवस पाणी जपून वापरा. कारण येत्या शुक्रवारी सकाळी नऊ ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात ठाणे पालिकेच्या योजनेतून टप्प्याटप्याने पाणीपुरवठा करण्यात येईल. 

शुक्रवारी सकाळी 9 ते रात्री 9 या काळात घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहिल. 

यानंतर शुक्रवारी रात्री 9 ते शनिवारी सकाळी 9 पर्यंत समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर,साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहिल. 

यानंतर पुढील काही दिवस ठाणे शहरात कमी दाबानं पाणीपुरवठा होईल. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.