औरंगाबादमध्ये अडीच हजार रुपयांसाठी दारुच्या बाटलीने तरुणाचा गळा चिरला

अडीच हजार रुपयांसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर इतर तीन आरोपी अजुनही फरार आहे. 

Updated: Dec 11, 2016, 12:11 AM IST
औरंगाबादमध्ये अडीच हजार रुपयांसाठी दारुच्या बाटलीने तरुणाचा गळा चिरला title=

औरंगाबाद : अडीच हजार रुपयांसाठी एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर इतर तीन आरोपी अजुनही फरार आहे. 

गुरूवारी रात्री अक्षयची हत्या करण्यात आली होती. रेल्वे स्टेशन परिसरात तो ऑम्लेट खायला आला होता. त्यावेळी त्याच्या खिशात पैसे असल्याचं त्याच्या दोन मित्रांनी पाहिलं होतं. त्यांनी अक्षयला दारु पाजली आणि त्यानंतर पुन्हा दुस-या परिसरात दारू पिण्यासाठी घेऊन गेले. आणि त्याचवेळी त्यांनी त्याचे पैसे लुटण्याचा प्रयत्न केला.

मात्र अक्षयने विरोध केल्यानं त्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्ये अक्षयचा दारुच्या बाटलीने गळा चिरला. त्यानंतर या तरुणांनी त्याच्या खिशातील काही कागदपत्रही जाळून टाकली. पण अक्षयच्या कॉलेजची फी भरल्याची पावती त्याच्या मृतदेहीजवळ सापडली आणि या खुनाचा उलगडा झाला.