अमरावतीत बापानेच स्वतःच्या दोन मुलांना दिले नरबळी

दिवाळीच्या दिवशी बापाने स्वतःच्याच दोन मुलांचा नरबळी दिल्याची धक्क्दायक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. या नराधन बापाला अटक करण्यात आली आहे.

Updated: Nov 2, 2016, 04:19 PM IST
अमरावतीत बापानेच स्वतःच्या दोन मुलांना दिले नरबळी title=

अमरावती : दिवाळीच्या दिवशी बापाने स्वतःच्याच दोन मुलांचा नरबळी दिल्याची धक्क्दायक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. या नराधन बापाला अटक करण्यात आली आहे.

सुधाकर सावलकर असे त्याचे नाव आहे. त्याला अमरावतीतल्या चिखलदरा तालुक्यातल्या खडीमलमधून अटक करण्यात आली. आठ वर्षांचा आकाश आणि सहा वर्षांचा आतिष या स्वतःच्याच दोन मुलांचा नरबळी दिल्याची कबुली त्यानं दिली. 

डोलारदेव जंगलाच्या दरीत त्यानं मुलांना नेले आणि त्यांच्यावर कु-हाडीचे वार करुन त्यांची हत्या केली. अटक केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर गुन्ह्याचा लवलेशही नव्हता. या क्रुर बापाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घरी परतल्यानंतर पत्नीने आपल्या मुलांबद्दल विचारणा केली. मात्र, पतीने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. परंतु त्यानंतर मुलाला देवाघरी पाठविल्याचे सांगून त्यांने घरून धूम ठोकली. पत्नीच्या मनात शंखेची पाल चूकचुकली. त्यानंतर नातेवाइकांनी रविवारी रात्रभर मुलांचा शोध घेतला. मात्र, मुले काही सापडली नाहीत. सोमवारी पुन्हा शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. 

स्वत:च्या मुलांची निर्घुनपणे हत्या करणारा हैवाण बाप सुधाकर हा जंगलात दडून बसल्याची माहिती  पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.