बीडमध्ये फळं खाल्ल्याने चिमुकल्यांचा मृत्यू

चिकू, सफरचंद खाल्ल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या गोलांग्री गावात घडलीये.

Updated: May 4, 2017, 04:47 PM IST
बीडमध्ये फळं खाल्ल्याने चिमुकल्यांचा मृत्यू title=

बीड : चिकू, सफरचंद खाल्ल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडच्या गोलांग्री गावात घडलीये.

साई भरत शिंदे आणि ओम शिंदे अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. तर या चिमुकल्यांच्या आईची प्रकृती ठीक असून त्यांना घरी सोडण्यात आलेय.

रात्री या तिघांनी चिकू आणि सफरचंद खाल्ले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला. या तिघांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, फळं खाल्याने मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा मृत मुलांच्या वडिलांनी केलाय. मात्र या चिमुरड्यांचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केलीये. अद्याप शवविच्छेदनाचा अहवाल आलेला नाही.