वर्धा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीत बुडून २ तरुण मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. 

Updated: Oct 28, 2016, 09:37 PM IST
वर्धा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू  title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीत बुडून २ तरुण मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. 

सगळीकडे दिवाळी उत्साहात साजरी होत असताना गुरूवारी संध्याकाळी वर्धा नदी जवळील माजरी गावातील ८ मुलं नदीवर फिरण्यासाठी गेले होते.

यातील जावेद अली आणि आकाश भारती हे १६ वर्षीय मुलं नदीत पोहण्यासाठी गेले. मात्र, नदीच्या मधोमध असतांना हे दोघंही बुडाले.

अंधार झाल्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बचाव कार्य करता आलं नाही. सकाळी स्थानिक लोकं, पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने मुलांचा शोध घेण्यात आला.

दुपारच्या दरम्यान दोन्ही मुलांचे शव नदीतून काढण्यात आले. या घटनेमुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर माजरी गावावर शोककळा पसरलीय.