मुख्यमंत्र्यांसोबतच्या वृक्षारोपणानंतर उद्धव ठाकरेंचा पुन्हा मुळावर घाव

केंद्र आणि राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला हाणला आहे. 

Updated: Jul 4, 2016, 03:50 PM IST
मुख्यमंत्र्यांसोबतच्या वृक्षारोपणानंतर उद्धव ठाकरेंचा पुन्हा मुळावर घाव title=

मुंबई : केंद्र आणि राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला हाणला आहे. जे द्यायचं ते सन्मानानं द्या, लाचार होऊन कोणासमोर जाणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

केंद्रात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेनं दोन जागा मागितल्याची चर्चा होती. यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नसली, तरी मुख्यमंत्र्यांसोबत जुजबी बोलणं झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.