अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना : अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना घडल्याचे अण्णा यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.

Updated: Jul 27, 2016, 04:17 PM IST
अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना : अण्णा  हजारे title=

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना घडल्याचे अण्णा यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.

अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. विधीमंडळात जाऊन अण्णांनी ही भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना वाढल्याचं अण्णांनी म्हटले आहे. यावेळी ग्रामसंरक्षक दल स्थापन करण्याची मागणी अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

गावागावातील नशाबंदी आणि जुगार तसंच सट्टा बंदीसाठी कायद्यात योग्य तो बदल करावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.