रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट सोडणार जादा 210 बसेस

रक्षाबंधनाचा उत्साह हळूहळू आता सर्वत्रच दिसू लागतोय. याच आनंदात भर पा़डणारी बातमी बेस्टने दिलीय. रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरात चाकरमान्यांच्या सोयीसाठी 210 बेस्ट बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Aug 26, 2015, 04:21 PM IST
रक्षाबंधनाच्या दिवशी बेस्ट सोडणार जादा 210 बसेस title=

मुंबई : रक्षाबंधनाचा उत्साह हळूहळू आता सर्वत्रच दिसू लागतोय. याच आनंदात भर पा़डणारी बातमी बेस्टने दिलीय. रक्षाबंधनाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरात चाकरमान्यांच्या सोयीसाठी 210 बेस्ट बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय.

बेस्टतर्फे 29 ऑगस्टला जादा 210 बेस्ट बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी बसथांब्यावर रक्षाबंधनादिवशी बसनिरीक्षक, वाहतूक अधिकारी नेमण्यात येणार आहे, असे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.