आरारंsss चव्हाण, पवारांच्या सुरक्षेला कात्री!

देवेंद्र फडणवीस सरकारनं राज्यातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

Updated: Jan 2, 2015, 04:10 PM IST
आरारंsss चव्हाण, पवारांच्या सुरक्षेला कात्री! title=

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारनं राज्यातल्या काही वजनदार राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

फडणवीस सरकारनं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील, माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री नारायण राणे तसंच माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या सुरक्षेला कात्री लावण्याचा निर्णय घेतलाय. 

यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यामुळे, सामान्यांच्या सुरक्षेसाठी 200 पोलीस उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.