मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईला पाणी पुरवणा-या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीये. त्यामुळे तलावांची पातळी हळूहळू वाढत चाललीये. 

Updated: Jul 2, 2016, 09:06 AM IST
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी title=

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईला पाणी पुरवणा-या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीये. त्यामुळे तलावांची पातळी हळूहळू वाढत चाललीये. 

विहार तलावाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी 142 मिमी, तुळशी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात 179 मिमी इतका पाऊस झालाय. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात एकलाख दशलक्ष लिटर इतकी वाढ झालीये. 

मात्र पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईपर्यंत सध्यालागू असलेली 20 टक्के पाणीकपात कायम रहाणार आहे.