कसाबच्या वकिलाने नाकारली फी, केलं देशप्रेम व्यक्त

मुंबईवर हल्ला करणाऱ्या क्रूरकर्मा कसाबाची केस लढवणारे वकिल राजू रामचंद्रन यांनी केस लढविण्याची फी नाकारली आहे. त्यामुळे नवा एक पायंडा घातला आहे.

Updated: Oct 3, 2012, 08:02 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईवर हल्ला करणाऱ्या क्रूरकर्मा कसाबाची केस लढवणारे वकिल राजू रामचंद्रन यांनी केस लढविण्याची फी नाकारली आहे. त्यामुळे नवा एक पायंडा घातला आहे.

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याचे वकिलपत्र घेतलेल्या अ‍ॅड. राजू रामचंद्रन यांनी त्याची फी नाकारली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ही फी २६/११ हल्ल्यातील मृतांच्या वारसांना देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. अ‍ॅड. रामचंद्रन यांना १४ लाख रुपये फी राज्य सरकारकडून दिली जाणार होती.