विकासकामांमुळे महाराष्ट्र नंबर वन - मुख्यमंत्री चव्हाण

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा राज्यात आमचे सरकार येईल, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्र देशात नंबर वन आहे, असे ते म्हणालेत.

Updated: Sep 12, 2014, 11:11 PM IST
विकासकामांमुळे महाराष्ट्र नंबर वन - मुख्यमंत्री चव्हाण title=

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा राज्यात आमचे सरकार येईल, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्र देशात नंबर वन आहे, असे ते म्हणालेत.

निवडणूक आयुक्त संपत यांनी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर लगेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. आघाडीने केलेल्या कामाच्या जोरावरच लोकांसमोर जाऊ आणि जनता पुन्हा एकदा आम्हाला निवडून देईल. आघाडीने केलेल्या विकासकामांमुळेच महाराष्ट्र देशात पहिला आहे, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा सुरू आहे. निवडणुकीचा जाहीरनामा लवकरच लोकांसमोर ठेवला जाईल. राज्यात आरोग्य, शिक्षण आणि महिलांची सुरक्षा यांसारख्या प्रश्नाकडे यापुढील काळात अधिक लक्ष दिले जाईल. तसेच राज्यात कुणीही उपाशी राहणार नाही, याची काळजी घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.