रंगाची बाधा : मुंबई पालिकेचा हलगर्जीपणा

मुंबईत झालेल्या रंगांच्या बाधेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारखान्याच्या बाहेरुन हे विषारी रंग मुलांनी उचलले, तो नवरंग कंपाऊंडमधला रंग बनवण्याचा अवैध कारखाना मुंबई महापालिकेनं नोव्हेंबर २०११ मध्ये तोडला होता. मात्र त्यातले रंग तिथेच पडून होते. ते रंग उचलण्याची कारवाई कुणीही केली नाही. आणि हाच रंग मुलांनी उचलला आणि होळीचा बेरंग झाला.

Updated: Mar 9, 2012, 06:49 PM IST

www.24taas.com,  मुंबई

 

 

मुंबईत झालेल्या रंगांच्या बाधेप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या कारखान्याच्या बाहेरुन हे विषारी रंग मुलांनी उचलले, तो नवरंग कंपाऊंडमधला रंग बनवण्याचा अवैध कारखाना मुंबई महापालिकेनं नोव्हेंबर २०११ मध्ये तोडला होता. मात्र त्यातले रंग तिथेच पडून होते. ते रंग उचलण्याची कारवाई कुणीही केली नाही.  आणि हाच रंग मुलांनी उचलला आणि होळीचा बेरंग झाला.

 

 

मुंबईत झालेल्या रंगांच्या बाधेप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.  ज्या अवैध कारखान्याच्या बाहेरुन रंग उचलण्यात आले. त्या कारखान्याच्या मालकाबद्दल या चौघांकडून चौकशी करण्यात येते आहे. दरम्यान,  मुंबईत रंगांची बाधा झालेल्या रुग्णांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सायन रुग्णालयात जाऊन भेट घेऊन विचारपूस केली.

 

 

रंगांच्या बाधेप्रकरणी  राज्य सरकारकडून पाच जणांची चौकशी समिती नेमण्यात आलीये. ही समिती दोन आठवड्यात आपला चौकशी अहवाल देईल, अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. दरम्यान, यामध्ये एका १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. बंद पडलेले रासायनिक कारखाने आणि विषारी रंग याबाबत सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासन सुद्ध या प्रकरणी चौकशी करणार आहे.