उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा

‘अब हिंदू मार नहीं खाएगा!’ ही गर्जना करणाऱ्यांचे राज्य देशात व जम्मू-कश्मीरातही आहे, पण हिंदू संकटातच आहे, अशा शब्दात पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

Updated: Jul 24, 2016, 10:20 AM IST
उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा title=

मुंबई : ‘अब हिंदू मार नहीं खाएगा!’ ही गर्जना करणाऱ्यांचे राज्य देशात व जम्मू-कश्मीरातही आहे, पण हिंदू संकटातच आहे, अशा शब्दात पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखातीमध्ये उद्धव ठाकरेंनी सर्वच मुद्द्यांवरुन सरकारवर जोरदार टीका केलीये. 

काश्मीरमध्ये जो भडका उडाला आहे त्याला जबाबदार कोण? असा खडा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. सरकार बदलल्यानंतरही सर्वसामान्यांचं आयुष्य कधी बदलणार अशा शब्दात त्यांनी सरकारवर तोफ डागली.