कर्णधार अजिंक्य राहणेंच्या मूळगावी जल्लोष

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी युवा फलंदाज अजिंक्य रहाणेची निवड होताच अजिंक्यच्या मूळगावी म्हणजे संगमनेर तालुक्यातील चंदनपुरीत जल्लोष साजरा करण्यात आला. 

Updated: Jun 30, 2015, 09:32 PM IST
कर्णधार अजिंक्य राहणेंच्या मूळगावी जल्लोष title=

अहमदनगर : झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी युवा फलंदाज अजिंक्य रहाणेची निवड होताच अजिंक्यच्या मूळगावी म्हणजे संगमनेर तालुक्यातील चंदनपुरीत जल्लोष साजरा करण्यात आला. 

अजिंक्यची निवड काल जाहीर होताच गावातील ग्रामस्थांनी फटाके वाजवून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला असून त्याच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत. आजही अजिंक्य रहाणेची आजी, चुलते व चुलती गावाकडेच वास्तव्यास असून ग्रामस्थांनी या कुटुबियांचा सत्कार केलाय. 

अजिंक्यचं बालपण संगमनेर तालुक्यातच गेलं. क्रिकेटमध्ये स्थिरावल्यानंतरही अजिंक्य गावाला विसरलेला नाही. 
काही दिवसांपूर्वीच अजिंक्यने गावी आपल्या कुटुंबियांसाठी विशेषत: आजीसाठी बंगला बांधलाय. झहीर खाननंतर अजिंक्यच्या निवडीमुळे अहमदनगर जिल्हाच्या नाव पुन्हा उंचावल आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.