एसटी पुलावरून कोसळून ३ ठार, ३८ जखमी

सातारा जिल्ह्यातील वर्धनगड घाटात आज एसटी कोसळून झालेल्या अपघातात तीन ठार तर ३८ प्रवासी जखमी झालेत. ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 23, 2013, 04:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,सातारा
सातारा जिल्ह्यातील वर्धनगड घाटात आज एसटी कोसळून झालेल्या अपघातात तीन ठार तर ३८ प्रवासी जखमी झालेत. ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.
दहिवडी डेपोची दहिवडी – सातारा या एसटीला हा अपघात झाला आहे. सातारा – सोलापूर राज्य मार्गावर कोरेगावपासून ७ किलोमीटर अंतरावर वर्धनगड घाट आहे. बस याठिकाणी आली असता चालकाचा ताबा सुटल्याने एसटी पुलावरून १५० फूट कोसळली. जखमींना सातारा शासकीय रुग्ण्यालात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

फोटोफीचर सातारा एसटी अपघात