रेल्वेखाली तीन जणांचा चिरडून मृत्यू

सांगली जिल्ह्यात मिरजजवळ आज सकाळी रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 27, 2013, 05:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सांगली
सांगली जिल्ह्यात मिरजजवळ आज सकाळी रेल्वे अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.
बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास मिरजजवळ हा अपघात घडलाय. सांगली-मिरज रेल्वेखाली सापडून या तिघांना आपला जीव गमवावा लागलाय, तर या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झालाय. जखमी व्यक्तीला मिरजेच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.