बांग्लादेश दौरा : भारतीय टीममध्ये नविन चेहऱ्यांना संधी

टीम इंडियाचा पुढील महिन्यात बांग्लादेश दौरा असणार आहे. ७ जूनला भारतीय टीम बांग्लादेशला रवाना होणार आहे. मात्र, या दौऱ्यात नविन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Updated: May 6, 2015, 01:07 PM IST
बांग्लादेश दौरा : भारतीय टीममध्ये नविन चेहऱ्यांना संधी title=

मुंबई : टीम इंडियाचा पुढील महिन्यात बांग्लादेश दौरा असणार आहे. ७ जूनला भारतीय टीम बांग्लादेशला रवाना होणार आहे. मात्र, या दौऱ्यात नविन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येण्याच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नविन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे टीम इंडियात कोण असेल याची उत्सुकता आहे.

बांग्लादेश दौऱ्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, आर अश्विन यांना विश्रांती देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कसोटी कर्णधार विराट कोहली  यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा असेल, असे सांगण्यात येत आहे.

प्रमुख पाच खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याने आयपीएल२०१५मध्ये जे युवा खेळाडू आपली छाप पाडतील त्यातील काहींना बांग्लादेश दौऱ्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यात अक्षर पटेल, रिद्धिमान साहा, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल आणि संदीप शर्मा या युवा खेळाडूंना टीममध्ये स्थान असेल. तसेच रणजी ट्रॉफीत चांगले प्रदर्शन करणाऱ्यांनाही संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.