पाकचा धुव्वा; ऑस्ट्रेलियाची गाठ आता भारताशी!

आजच्या रंगतदार मुकाबल्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात करत वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठलीय. 

Updated: Mar 20, 2015, 06:48 PM IST
पाकचा धुव्वा; ऑस्ट्रेलियाची गाठ आता भारताशी! title=

अॅडलेड : आजच्या रंगतदार मुकाबल्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात करत वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठलीय. 

पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियासमोर 214 रन्सचं टार्गेच ठेवलं होतं हे आव्हान पार करताना कांगारुंची चांगलीच दमछाक झाली. वहाब रियाझच्या तेज माऱ्यासमोर कांगारुंच्या टॉप ऑर्डरनं सपशेल गुडघे टेकले होते. मात्र, अखेर कांगारुंनी ही लढत जिंकत आपला सेमी फायनलचा प्रवेश निश्चित केला. 

अर्धशतक ठोकणारे स्टिव्हन स्मिथ आणि शेन वॉटसन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या पराभवामुळे पाकिस्तान टीम वर्ल्डकपच्या युद्धातून बाहेर झालीय. 

आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपची सेमी फायनल रंगेल. भारत  आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनल आता 26 मार्चला सिडनीत होणार आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.