श्रीलंकेला नमवत भारताला आशिया कपचे जेतेपद

अंतिम सामन्यात श्रीलंकेवर ३४ धावांनी विजय मिळवत भारताच्या अंडर १९ संघाने आशिया कपचे जेतेपद मिळवले. 

Updated: Dec 24, 2016, 08:33 AM IST
श्रीलंकेला नमवत भारताला आशिया कपचे जेतेपद title=

कोलंबो : अंतिम सामन्यात श्रीलंकेवर ३४ धावांनी विजय मिळवत भारताच्या अंडर १९ संघाने आशिया कपचे जेतेपद मिळवले. 

भारताचा कर्णधार अभिषेक शर्माने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताला या सामन्यात यश मिळवता आले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २७३ धावा केल्या. 

प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ २३९ धावांवर गारद झाला. भारताकडून शर्माने सर्वाधिक ३७ धावांमध्ये ४ विकेट घेतल्या. कर्णधार अभिषेक शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर हिमांशू राणाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.