भारताचा एक डाव आणि ९२ धावांनी विजय

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वेस्ट इंडिज संघाला, त्यांच्याच मैदानात पराभूत केलं आहे. एक डाव आणि 92 धावांनी, टीम इंडियानं वेस्ट इंडिजनं विजय मिळवलाय. 

Updated: Jul 25, 2016, 07:55 AM IST
भारताचा एक डाव आणि ९२ धावांनी विजय title=

अँटिग्वा : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वेस्ट इंडिज संघाला, त्यांच्याच मैदानात पराभूत केलं आहे. एक डाव आणि 92 धावांनी, टीम इंडियानं वेस्ट इंडिजनं विजय मिळवलाय. 

भारतानं प्रथम फलंदाजी करताना, 566 धावांचा डोंगर उभारला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 243 धावांमध्ये गारद झाला. 

त्यामुळे फॉलो ऑन घेऊन पुन्हा मैदानात उतरलेल्या विंडिजचा दुसरा डावही 231 धावांवर आटोपला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1 - 0 ने आघाडी घेतली आहे.