भारत-पाकची दुसऱ्या स्थानावर बरोबरी...

वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात भारताने यूएईचा ९ गडी राखून पराभव केल्यानंतर भारताने वन डे सामने जिंकण्यात पाकिस्तानची बरोबरी केली आहे. आतापर्यंत भारताने ४४० सामने जिंकले आहेत. 

Updated: Feb 28, 2015, 04:52 PM IST
 भारत-पाकची दुसऱ्या स्थानावर बरोबरी...  title=

मुंबई : वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात भारताने यूएईचा ९ गडी राखून पराभव केल्यानंतर भारताने वन डे सामने जिंकण्यात पाकिस्तानची बरोबरी केली आहे. आतापर्यंत भारताने ४४० सामने जिंकले आहेत. 

वन डे क्रिकेट जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून सर्वाधिक सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया ५२३ सामन्यांसह पहिला क्रमांकावर आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांनी ४४० सामने जिंकून दुसरा क्रमांक विभागून घेतला आहे. भारताचा असाच फॉर्म कायम राहिल्यास भारत पाकिस्तानला मागे टाकू शकतो. 

पाहू या कोणत्या देशाने जिंकले किती सामने... 

ऑस्ट्रेलिया 523
पाकिस्तान 440
भारत 440*
वेस्ट इंडिज  372
श्रीलंका 354
दक्षिण आफ्रिका  328
इंग्लड 308
न्यूझीलंड 295
झिम्बाब्वे 114
बांगलादेश  86

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.