टीम इंडियाला भारताला सेमीफायनलचा मौका

रोहित शर्माच्या १३७ दमदार सेंच्युरीनंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळं भारतानं बांग्लादेशचा १०९ रन्सनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

Updated: Mar 19, 2015, 05:45 PM IST
टीम इंडियाला भारताला सेमीफायनलचा मौका title=

मेलबेर्न: रोहित शर्माच्या १३७ दमदार सेंच्युरीनंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळं भारतानं बांग्लादेशचा १०९ रन्सनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

भारताच्या ३०३ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशचे सर्व बॅट्समन १९३ रन्सवर आऊट झाले. उमेश यादवनं ४ तर शमी आणि जडेजानं प्रत्येकी २ आणि मोहित शर्मानं १ विकेट घेत बांग्लादेशच्या बॅट्समनचा धुव्वा उडवला. 

रोहित शर्मा आणि सुरेश रैनाच्या खेळीच्या आधारे भारतानं बांग्लादेशसमोर विजयासाठी ३०३ रन्सचं आव्हान दिलं होतं. भारतानं ५० ओव्हरमध्ये सहा विकेट गमावत ३०२ रन्स केले असून शेवटच्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीनं भारतानं ३०० चा टप्पा ओलांडला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.