'दादा'नं केली 'विराटच्या गर्लफ्रेंड'ची पाठराखण!

विराट आऊट झाल्यानंतर अनुष्कावर झालेल्या टीकेमुळे टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली तिची पाठराखण करण्यासाठी धावून आलाय. 

Updated: Mar 27, 2015, 01:38 PM IST
'दादा'नं केली 'विराटच्या गर्लफ्रेंड'ची पाठराखण! title=

सिडनी : विराट आऊट झाल्यानंतर अनुष्कावर झालेल्या टीकेमुळे टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली तिची पाठराखण करण्यासाठी धावून आलाय. 

वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना विराट कोहली केवळ एक रन करून तंबूत परतला... त्यानंतर त्याची मैत्रिण अनुष्का शर्मा हिच्यावर क्रिकेट फॅन्सनं तोंडसुख घेतलं... यामुळेच दादा चांगलाच वैतागलाय. त्यानं, या क्रिकेट फॅन्सला चांगलंच फैलावर घेतलंय. 

'ही तर लोकांच्या अपरिपक्वतेची निशाणी आहे... हे लोकांची घाणेरडी मानसिकता आहे' या शब्दांत सौरवनं आपली चीड व्यक्त केलीय.

'अनुष्कानं काय चुकीचं केलं... ती तर केवळ मॅच पाहण्यासाठी मैदानावर हजर झाली होती... तिच्याप्रमाणेच इतर खेळाडुंचे कुटुंबीयही इथं आले होते. कोहलीच्या चांगलं न खेळण्याबाबत अनुष्काला जबाबदार धरणं पूर्णपणे चुकीचं आहे' असं सौरव 'दादा'नं म्हटलंय. 

एव्हढ्यावरच तो थांबला नाही... सौरव पुढे म्हणतो, जर दोन लोकांचं एकमेकांवर प्रेम असेल तर त्यात चुकीचं ते काय?... असं म्हणताना दादानं नकळतपणे अनुष्का आणि विराटच्या वतीनं त्यांचं नातं जाहीर करून टाकलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.