आफ्रिदीने जाता जाता केलं विराटचं कौतूक

ऑस्ट्रेलिया विरोधात पराभव स्विकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचं वर्ल्डकप मधलं आव्हान संपूष्टात आलं आहे. मात्र जाता जाता आफ्रिदीने विराट कोहलीचं कौतूक केलं आहे.

Updated: Mar 25, 2016, 09:22 PM IST
आफ्रिदीने जाता जाता केलं विराटचं कौतूक title=

मोहाली : ऑस्ट्रेलिया विरोधात पराभव स्विकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचं वर्ल्डकप मधलं आव्हान संपूष्टात आलं आहे. मात्र जाता जाता आफ्रिदीने विराट कोहलीचं कौतूक केलं आहे.

आफ्रिदीने कोहलीला 'सचिन तेंडुलकरप्रमाणे भारताची भिंत असल्याचं म्हटलं आहे. कोहलीच्या बॅटमुळे भारत मॅच जिंकत आहे. ज्याप्रकारे सचिन हा भारताला मॅच जिंकूण द्यायचा ते काम आता विराट करतोय' असं देखील त्याने म्हटलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मितला देखील जेव्हा सेमीफायनल मध्ये होणाऱ्या भारतासोबतच्या मॅच बद्दल विचारण्यात आलं तर स्मिथ बोलला की, भारत ही सर्वोत्कृष्ठ टीम आहे त्यांना हरवणं कठिण आहे.