टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

सेंट ल्युशिया कसोटीत टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा 237 धावांनी धुव्वा उडवलाय. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विडींजचा दुसरा डाव 108 धावात गुंडाळण्यात भारताला यश आलं. 

Updated: Aug 14, 2016, 08:29 AM IST
टीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा title=

सेंट ल्युशिया : सेंट ल्युशिया कसोटीत टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा 237 धावांनी धुव्वा उडवलाय. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विडींजचा दुसरा डाव 108 धावात गुंडाळण्यात भारताला यश आलं. 

या विजयासह चार कसोटी सामन्यांची मालिका भारताने जिंकलीय. मालिकेत भारतानं 2-0 अशी बढत मिळवलीय. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी झटपट धावा करत विडींजसमोर 346 धावांचं आव्हान ठेवलं होतं.. 

अखेर भारतीय गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीपुढं विडींज फलंदाजांनी सपेशल लोटांगण टाकलं.. इशांत शर्मा, जाडेजा यांनी प्रत्येकी दोन तर अश्विन आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक विकेट घेतली.

पहिल्या डावातील शतकवीर आर.अश्विनला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.