आरसीबीचा कर्णधार कोहलीने मागितली चाहत्यांची माफी

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे आयपीएलमधून हा संघ बाद झालाय.

Updated: May 8, 2017, 06:08 PM IST
आरसीबीचा कर्णधार कोहलीने मागितली चाहत्यांची माफी title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे आयपीएलमधून हा संघ बाद झालाय.

आरसीबीच्या खराब कामगिरीबद्दल कर्णधार विराटने आपल्या चाहत्यांची माफी मागितलीये. रविवारी रात्री त्याने ट्विटरद्वारे चाहत्यांची माफी मागितलीये. 

आरसीबीच्या सर्व चाहत्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल तसेच सहकार्याबद्दल आभार, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही याबाबत माफी मागतो असं कोहलीने ट्विटरवर म्हटलंय.