निराशाजनक पराभवानंतर विराटची फलंदाजांवर टीका

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला रविवारी कोलकात्याकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. आयपीएलच्या १० वर्षाच्या इतिहासात जे घडले नाही ते काल कोलकाता आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यात घडले. 

Updated: Apr 24, 2017, 03:44 PM IST
निराशाजनक पराभवानंतर विराटची फलंदाजांवर टीका title=

कोलकाता : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाला रविवारी कोलकात्याकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. आयपीएलच्या १० वर्षाच्या इतिहासात जे घडले नाही ते काल कोलकाता आणि बंगळुरु यांच्यातील सामन्यात घडले. 

कोलकात्याने विजयासाठी दिलेल्या १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटचा संघ अवघ्या ४९ धावांत गारद झाला. आयपीएलमध्ये इतक्या कमी धावसंख्येत कोणताच संघ बाद झाला नव्हता. 

सामन्यातील निराशाजनक पराभवानंतर विराटने फलंदाजांवर जोरदार टीका केलीये. या सामन्यातील आमची कामगिरी सर्वात वाईट होती. आम्हाला वाटले की आम्ही कोलाकात्याचे आव्हान सहज पूर्ण करु. मात्र फलंदाजांनी साफ निराशा केली. 

बंगळूरुच्या संघात एकाहून सरस असे फलंदाज असतानाही त्यांच्या संघाला पराभव सहन करावा लागला. संघातील एकाही खेळाडूला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. या पराभवानंतर सोशल मीडियावरही बंगळूरुची खिल्ली उडवली जातेय.